Maharashtra Lockdown 2021 : महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्य शासनाने आधी नाइट कर्फ्यू, नंतर शनिवार व रविवारचे वीकेंड लॉकडाउन आणि आता लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णसंख्येत घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे विक्रमी 63,729 रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक आहे. Maharashtra Lockdown 2021 number of Corona patients rapidly increasing
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. राज्य शासनाने आधी नाइट कर्फ्यू, नंतर शनिवार व रविवारचे वीकेंड लॉकडाउन आणि आता लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णसंख्येत घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे विक्रमी 63,729 रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक आहे.
शुक्रवारी राज्यात 63,729 रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यातील बाधितांचा एकूण आकडा हा 37,03,584 वर गेला आहे. तर मागच्या 24 तासांत 398 जणांच्या मृत्यूनंतर कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या वाढून 59,551 झाली आहे. यादरम्यान 45,335 जण बरेही झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 30,04,391 जण कोरोनातून बरे झालेले आहेत. सध्या 6,38,034 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे, आज मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे आढळले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या 24 तासांत 8839 जणांना संसर्ग झाला आणि 53 जण मरण पावले. आतापर्यंत मुंबईत एकूण 5,61,998 जणांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत एकूण 12,242 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4,63,344 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल आहेत. सध्या 85,226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra Lockdown 2021 number of Corona patients rapidly increasing
महत्त्वाच्या बातम्या
- CBSE नंतर आता ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, नव्या तारखांबाबत जूनमध्ये निर्णय
- Tesla Cars India : टेस्लाने भारतात कारचे उत्पादन केले, तर आम्ही मदतच करू! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- Nirav Modi Extradition : ब्रिटन सरकारच्या मंजुरीनंतरही लांबू शकते नीरव मोदीचे प्रत्यार्पण, हे आहे कारण
- योगी सरकारचे जबरदस्त निर्णय, कोरोनाच्या निर्बंधांसोबतच गरिबांना रोख मदत, मोफत रेशनचीही सोय
- केंद्रीय गृहमंत्रालयात 50 टक्केच उपस्थिती ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना