• Download App
    फोन टॅपिंग : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत! । Maha Dy CM Ajit Pawar Says Fact In Nana Patole Complaint About Phone Tapping

    Phone Tapping : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत!

    Phone Tapping : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, नाना पटोले यांनी केलेली तक्रार योग्य आहे. जर त्यांनी असे म्हटले असेल की, भाजपने त्यांचा फोन टॅप केला तर ते नाकारले जाऊ शकत नाही. अजित पवार म्हणाले की, जर कोणी वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचे फोन टॅप करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. Maha Dy CM Ajit Pawar Says Fact In Nana Patole Complaint About Phone Tapping


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, नाना पटोले यांनी केलेली तक्रार योग्य आहे. जर त्यांनी असे म्हटले असेल की, भाजपने त्यांचा फोन टॅप केला तर ते नाकारले जाऊ शकत नाही. अजित पवार म्हणाले की, जर कोणी वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचे फोन टॅप करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांचे फोन टॅपिंग खोटी नावे देऊन करण्यात आले, नाना पटोले यांच्या बाबतीतही असे घडले आहे. तथापि, ते राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुरक्षेसाठी केले असेल तर ते ठीक आहे, परंतु ते वैयक्तिक फायद्यासाठी असेल तर ते बेकायदेशीर आहे, असे अजित पवार म्हणाले.

    फडणवीस यांच्या कारकीर्दीत फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    Maha Dy CM Ajit Pawar Says Fact In Nana Patole Complaint About Phone Tapping

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आणीबाणी मध्ये जयप्रकाशांची संपूर्ण क्रांती समाजवाद्यांनी सोडून दिली वाऱ्यावर; संघाच्या स्वयंसेवकांनी चालविले आंदोलन!!

    Narendra Modi : ‘या दिवशी मूलभूत अधिकार हिरावून घेतले, संविधानातील मूल्ये नष्ट केली गेली’

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने राहुल गांधींना बोलावले; महाराष्ट्र निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर चर्चा करणार