• Download App
    कालीचरण महाराज म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे विष्णुचा अवतार Kalicharan Maharaj says that Prime Minister Narendra Modi and Yogi Adityanath are incarnations of Vishnu

    कालीचरण महाराज म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे विष्णुचा अवतार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवान विष्णूचा अवतार आहेत. महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नाही, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते.Kalicharan Maharaj says that Prime Minister Narendra Modi and Yogi Adityanath are incarnations of Vishnu


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवान विष्णूचा अवतार आहेत. महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नाही, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.

    छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अँकरने कालीचरण महाराज यांना विचारले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींना तुम्ही शिवीगाळ केली? हे खरे आहे का?

    प्रत्युत्तरादाखल कालीचरण म्हणाले, मला गांधींना शिव्या दिल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. शिव्या रागाने बाहेर येतात, माझ्या मनातल्या वेदना जाग्या झाल्या, त्यामुळे मी ते बोललो. मी महात्मा गांधींना संत आणि राष्ट्रपिता मानत नाही. त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी काय केले? एकच धर्म डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. त्यांनी जनतेचा विश्वासघात करण्याचे कृत्य केले होते.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींची पूजा करतात आणि तुम्ही त्यांना शिवीगाळ करत आहात? असं विचारलं असता कालीचरण महाराज म्हणाले, मी पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार मानतो. गांधींना शिवीगाळ केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही.

    देशाच्या पंतप्रधानपदासाठी सरदार पटेल यांना मते मिळाली होती आणि एकही मत नेहरूंना नव्हते, तरीही नेहरूंना पंतप्रधान का केले. घराणेशाहीची मुळे पसरवणाऱ्या गांधींनी काँग्रेसच्या इतरांना निराश केले. सरदार पटेल यांच्याकडे पंतप्रधानपद असते तर भारत सोन्याचा पक्षी झाला असता आणि भारत जगतगुरू झाला असता. भारत अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती बनला असता. गांधींनी हा विश्वासघात केला, त्यामुळे माझ्या मनात गांधींबद्दल तिरस्कार आहे. गांधी हे घराणेशाहीचे जनक आहेत, राष्ट्रपिता नाहीत.

    Kalicharan Maharaj says that Prime Minister Narendra Modi and Yogi Adityanath are incarnations of Vishnu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?