विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं सरकार नाही ,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी फडणवीस यांनी केली .It is not the state government that has brought Amarpatta
त्यावेळी वणी येथे ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या देताना ते म्हणाले, आमचे सरकार येणार आहे, ते येणारच आहे. सत्तेत असताना जनतेच्या हिताचे काम केले. आता विरोधात असताना संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढू, असेही फडणवीस म्हणाले. वणी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
- अमरपट्टा घेऊन आलेले हे राज्य सरकार नाही
- देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला
- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी
- आमचे सरकार येणार आहे, ते पुन्हा येणारच आहे
- सत्तेत असताना जनतेच्या हिताचे काम केले.
- आता विरोधात असताना जनतेसाठी काम करणार