• Download App
    यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाजIndian metrological Department prediction ९९% rain this year

    यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

    यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.Indian metrological Department prediction ९९% rain this year


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – स्कायमेट या संस्थेन बुधवारी त्यांचा हवामान विषयक अंदाज प्रसिद्ध केल्यावर आता भारतीय हवामान खात्यानेही गुरुवारी त्यांचा अंदाज प्रसिद्ध केला. यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पिकपाणी चांगले होणार याचे हे संकेत आहे. Indian metrological Department prediction ९९% rain this year

    भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पावसाळ्याविषयी माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी यंदाचा अंदाज वर्तवला. या वर्षी नैऋत्य मोसमी वा-याची दिशा ही चांगली राहणार आहे. मान्सून चांगला बरसणार असल्याने पाण्याची चिंता मिळणार आहे. संपूर्ण देशभरात ही स्थिती राहणार आहे. सरासरी ९६ ते १०४ टक्के पाऊस यंदाच्या हंगामात पडण्याची शक्यता आहे.

    देशातील एकुण पर्जन्यमानापैकी मॉन्सूनमध्ये जवळपास ७४ ते ७५ टक्के पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाळ्यात सरासरी ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेती हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने वेळेवर पेरण्या होऊन शेतक-यांना चांगल्या उत्पन्नाची आशा राहणार आहे. जर चांगला पाऊस राहिला तर सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येऊ शकते म्हणून तो दिलासादायक ठरेल. सरासरीच्या ९९ टक्के पाऊस म्हणजे २०२० पर्यंत गेल्या पन्नास वर्षात साधारण ८६८ मीमीटर इतकं आहे. याच्या सरासरी ९९ टक्के म्हणजे हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो. त्यामुळे यंदाचा पाऊस चांगला असेल असे सांगितले जात आहे.

    Indian metrological Department prediction ९९% rain this year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!