जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली. He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar
विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी या साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे.दरम्यान जावेद अख्तर यांनी देखील नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थिती नोंदवली होती. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची.”
तसेच जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली.दरम्यान जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात टीकास्त्र सोडले आहे.
टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की , “पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर हे आता इतिहासकारांच्या भूमिकेत आले आहेत. नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत.” ब्रिगेडी राजकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय, असा घणाघातही अतुल भातखळकर यांनी केला आहे.
He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचार्यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा – प्रवीण दरेकर
- ‘सामना’तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच!
- Omicron Variant : सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाचा खुलासा – कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन जास्त धोकादायक असल्याचा सध्या पुरावा नाही!
- आत्मनिर्भर भारतातून संरक्षणाचा बूस्टर डोस; अमेठीत बनणार ५ लाख ए के २०३ एसॉल्ट रायफली!!