वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray
“महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय.”
“हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते, तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनि संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. पोलीस आम्हाला थांबवत आहे. शिवसैनिकांना दारासमोर उभं करून आमच्या विरोधात गुंडागर्दी, हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय.”
ते म्हणाले, हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये, असे आवाहन रवी राणा यांनी केले.
hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या विरोधात संघर्ष टोकाला नेऊन शिवसेना फसली की उसळली…??
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!