विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकार मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकते. प्रीमियमध्ये सूट देऊ शकते, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देते, बेवड्यांसाठी पॉलिसी तयार करू शकते पण हे सरकार शेतकऱ्यांना सुट देत नाही. सरकार संवेदनशुन्य आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ऊजार्मंत्री हरताळ फासतात हेही गंभीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Government is insensitive towards farmers, energy minister against Deputy CM’s assurance, Devendra Fadnavis alleges
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांनी एवढीच विनंती केली, की सातत्याने नापिकी आहे. ओला, सुका दुष्काळस्थितीमुळे विजेच्या बिलाची थकबाकी आहे. वीज कनेक्शन कापू नका. तरीही सरसकट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन कापणं सुरू आहे.
हे योग्य नाही. सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून, मला आता जगण्यात रस नाही, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे असे सांगत आत्महत्या केली. सुरज जाधव यांचे वीज कनेक्शन या सरकारने कापले होते.
सुरजच्या मृत्यूनंतर सरकारला जाग यायला हवी होती, पण सरकारने असंवेदनशिलता दाखविली असा आरोप फडणवीस यांनी केला. सरकारने सभागृहातून पळ काढल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केली.
Government is insensitive towards farmers, energy minister against Deputy CM’s assurance, Devendra Fadnavis alleges
महत्त्वाच्या बातम्या
- Exit Poll : उत्तर प्रदेशासह 5 राज्यात चर्चा महिलांच्या status voting ची आणि तरुणांच्या class voting ची…!!
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक
- Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये जय भाजपा तय भाजपा ! डबल इंजिन सरकार … मोदी-योगी सरकार..
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??