• Download App
    मेट्रो कारशेडवरून फडणवीसांची ठाकरेंवर टीका : मविआच्या समितीनेच दिला होता कांजूरविरोधात अहवाल, प्रकल्प हलवण्यामागे ठाकरेंचा इगो|Fadnavis criticizes Thackeray on Metro carshed It was Mavia's committee that gave the report against Kanjur, Thackeray's ego behind moving the project

    मेट्रो कारशेडवरून फडणवीसांची ठाकरेंवर टीका ; मविआच्या समितीनेच दिला होता कांजूरविरोधात अहवाल, प्रकल्प हलवण्यामागे ठाकरेंचा इगो

    प्रतिनिधी

    मुंबई : मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजूर मार्गला हलवता येणार नाही, असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या सौनक समितीनेच दिला होता. पण तरीही उद्धव ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांचा इगो होता, त्यांचा निर्णय मुंबईकरांच्या हितासाठी घेतला गेला नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.Fadnavis criticizes Thackeray on Metro carshed It was Mavia’s committee that gave the report against Kanjur, Thackeray’s ego behind moving the project

    फडणवीस म्हणाले की, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पण मुंबईच्या हितासाठी आम्ही मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला आहे. लोकलमुळे अपघात होतात अशा प्रवाशांसाठी आमची लाइफलाइन म्हणजे मेट्रो प्रकल्प आहे. आमच्या सराकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे मविआ उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.



    जी झाडे कापली ती तेथे पूर्ण जीवनकाळात जेवढा कार्बन उत्सर्जित करेल तेवढा कार्बन मेट्रो ८० दिवसांत करणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी व्हावे, हे आमचे धोरण आहे. आम्ही काम सुरू केले तेव्हा आंदोलन झाले नाही, पण २५ टक्के काम झाल्यानंतर विरोध सुरू झाला.

    फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरे जरूर पर्यावरण मंत्री होते; पण त्यांनीच सर्व अभ्यास केला असा त्याचा अर्थ होत नाही.

    Fadnavis criticizes Thackeray on Metro carshed It was Mavia’s committee that gave the report against Kanjur, Thackeray’s ego behind moving the project

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस