विशेष प्रतिनिधी
जालना : कोरोनाकाळात रेल्वेला 36 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, या काळात मालवाहतुकीने रेल्वेला तारले. मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. सध्या निमार्णाधीन असलेल्या मुंबई-नागपूर द्रूतगती मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित केला जाईल,असेहीत्यांनी सांगितले.Due to corona railways loses Rs 36,000 crore
जालना येथील रेल्वेस्थानकावरील अंडरब्रिजच्या पायाभरणी सोहळ्यात दानवे बोलत होते. ते म्हणाले, प्रवासी रेल्वेगाड्या नेहमीच तोट्यात चालतात. तिकिटाचे दर वाढवल्यास त्याचा परिणाम प्रवाशांना होतो. त्यामुळे आम्ही ते कोरोनाकाळात करू शकलो नाही.
केवळ मालवाहतुकीतून रेल्वेला महसूल मिळतो. कोरोनाकाळात रेल्वेच्या मालवाहतुकीने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली असून, सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.बुलेट ट्रेनबाबत दानवे म्हणाले की, लोकांसाठी आवश्यक असल्याने हा प्रकल्प मुंबई-नागपूर द्रूतगती मार्गावर आणला जाईल. रेल्वेने पश्चिम मार्गिका समर्पित प्रकल्प हाती घेतला असून, या माध्यमातून नवी मुंबई आणि दिल्लीची जोडणी केली जाईल.
Due to corona railways loses Rs 36,000 crore
महत्त्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक
- भूसंपादनातील विलंब, वन आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंजुरीअभावी रखडलेत ४८३ प्रकल्प, ४.४३ ला रुपये खर्च जादा होणार
- ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार
- निर्वासितांच्या बुरख्याखाली दडलेले अफगाण दहशतवादी स्वीकारणार नाही… रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांचा अमेरिका व युरोपीय देशांना कडाडून विरोध