• Download App
    भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाकरे - पवार सरकार हादरले यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद : देवेंद्र फडणवीस|Due to BJP's Jana Aashirwad Yatra Thackeray - Pawar government shaken

    WATCH :भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाकरे – पवार सरकार हादरले यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद : देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रात नवनियुक्त भाजपच्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हादरले आहे, असे भाजपचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.Due to BJP’s Jana Aashirwad Yatra Thackeray – Pawar government shaken

    पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले. नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भरती पवार आणि कपिल पाटील यांनी मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर जनाआशिर्वाद यात्रा काढल्या. त्याचे जनतेने मोठे स्वागत केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गंभीर नाही. त्यांचे प्रश्न एकून घेणारे कोणीच नाही, असा आरोप केला.



    कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, पत्रकारांना १५ राज्यांनी फ्रँटलाईन वर्कर घोषित केले असताना पुरोगामी महाराष्ट्र असल्याचा डंका पिटणारे सरकार मागे कसे राहिले ? हेच मला कळत नाही. शिवस्मारकाचा प्रश्न दोन वर्षे प्रलंबित आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.

    • भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे सरकार हादरले
    • चार यात्रांना जनतेचा उदंड प्रतिसाद
    • राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली
    •  शेतकरी आत्महत्याबाबत सरकार गंभीर नाही
    • शेतकऱ्यांचे प्रश्न एकून घेणारे कोणीच नाही
    • कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज
    • पत्रकारांना फ्रटलाईन वर्कर घोषित करण्याची गरज
    • शिवस्मारकाचा प्रश्न दोन वर्षे प्रलंबितच आहे

    Due to BJP’s Jana Aashirwad Yatra Thackeray – Pawar government shaken

     

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!