• Download App
    नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्चला भाजपचा मोर्चा, देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्वDevendra Fadnavis will lead the BJP's march on March 9 to demand the resignation of Nawab Malik

    नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्चला भाजपचा मोर्चा, देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

    अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करणार आहेत.Devendra Fadnavis will lead the BJP’s march on March 9 to demand the resignation of Nawab Malik


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करणार आहेत.

    आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिकांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले.

    विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा असा काही प्रकार इतिहासात पहिल्यांगदाच घडत असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इतिहासात असं कधीही घडलं नाही. राज्याचे एक मंत्री दाऊदसोबत व्यवहार केल्याचा, हसीना पारकरला पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्या स्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून हसीना पारकरला पैसे देऊन हे काम झालं आहे. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. असं असताना एखादा मंत्री मंत्रीपदावर राहातो, हे नैतिकतेला धरून नाही”.

    Devendra Fadnavis will lead the BJP’s march on March 9 to demand the resignation of Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?