प्रतिनिधी
मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणजे भाजप मध्ये गेले की भ्रष्टाचार साफ होतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला. Devendra Fadnavis also responded to Ddhav Thackeray’s strong speech in “Right to Reply” in the Assembly.
उद्धव ठाकरे यांच्या जोरदार भाषणाला देवेंद्र फडणवीस यांनी देखील “राईट टू रिप्लाय” मध्ये विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
तुम्ही आम्हाला शिखंडी म्हणता. पण तुम्ही मोदींबरोबर मते मागितलीत. बहुमत मिळाले. पण सत्तेवर कोणत्या शकुनी बरोबर गेलात!!, हे सगळ्या महाराष्ट्राची जनता पाहते आहे, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लगावला. मुख्यमंत्र्यांचे भाषण हे विधानसभेतले भाषण होते की हा शिवाजी पार्कवरचे भाषण होते?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.
– नुसता टोमणे बॉम्ब
विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. त्यांचे भाषण म्हणजे केवळ “टोमणे बाँब” होता. यापेक्षा बाकी काही नव्हते. पण टोमणे मारून राज्य करता येत नाही. सरकार चालवता येत नाही. गव्हर्नन्स करता येत नाही, असे फडणवीसांनी सुनावले. ईडीला ते घरगडी म्हणाले पण मग सरकारी वकिलांबरोबर पासून सत्ताधारी मंत्री आणि नेते विरोधी पक्षांवर खोटे खटले दाखल करायचे म्हणत होते ते सरकारी वकील आणि पोलिस हे काय तुमचे घरगडी आहेत का?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
विरोधी पक्षांनी तुमच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर ती का केली हा गैरसमज काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. फक्त तुम्ही म्हणजेच मराठी नाही, असे देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तरे देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी भाषणबाजीत वेळ घालवला. कविता वाचून दाखवल्या. त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाहीत. भ्रष्टाचारी तुरूंगात घातलेत ते बाहेर येत नाहीत आणि नवाब मलिक यांच्या सारख्या दाऊदशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे मुख्यमंत्र्यांना समर्थन करायला लागते इतकी शिवसेनेच्या अवस्था वाईट झाली आहे, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या आव्हानात्मक भाषणातले मुद्दे :
- राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना, शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून आता घरच्यांनाही सोडले जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मागून कुटुंबीयांना त्रास देण्यात येत आहे.
- तुमच्यात जर हिंमत असेल तर मला टाका तुरुंगात. मी घाबरत नाही तुरुंगात जायला.
- रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत दिसतो.
- ईडी आहे की घरगडी? सत्तेसाठी उगाचच कुणाचे नाव खराब करू नका, कुटुंबीयांची बदनामी कशासाठी? हवे तर मला तुरूंगात टाका. शिवैनिकांची जबाबदारी मी घेतो.
- कोरोनामध्ये सर्व कामं ही टेंडर काढूनच केली. सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यावर हरकती मागवल्या आहेत. अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
- महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केली आहेत. ही कामे सांगण्याआधीच राज्यपालांनी अभिभाषण मध्येच सोडून गेले. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या नाहीत.
- सरकारचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मात्र, दाऊद कोठे राहतो, हे कोणालाच माहिती नाही. त्याचा ठाव ठिकाणा माहिती नाही. केवळ आरोप करुन भ्रम निर्माण केला जात आहे. दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले.
- नवाब मलिक किती वेळा निवडून आलेत. त्यावेळी त्यांचा संबंध नव्हता का? आधी गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी जाहीर केले होते. दाऊदला फरफट आणू, पुढे काय झाले? आधी राम मंदिरचा मुद्दा होता. त्यावर मत मागितली निवडणुकीत आता दाऊद दिसतो का?
- राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे, याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल.
Devendra Fadnavis also responded to Ddhav Thackeray’s strong speech in “Right to Reply” in the Assembly.
महत्त्वाच्या बातम्या
- SONU NIGAM : महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …
- काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
- Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??
- मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप