Pandarpur Vari : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे. Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ शकली नव्हती. संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने निर्बंध घातलेले होते. राज्यात तेव्हा कडक लॉकडाऊन होते. परंतु यावर्षी मात्र पायी वारीला मान्यता मिळालीच पाहिजे, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीने घेतली आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले म्हणाले की, यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी यावर वेळकाढूपणा न करता त्वरित वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे लवकरच अनलॉकही होण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांच्या मागणीवर आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Demand For Pandarpur Vari by BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- रामदेव बाबा यांचे अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ; दिल्ली उच्च न्यायालय
- पाकिस्तानची मस्ती एका झटक्यात उतरविणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या मुखातून ऐका रामस्तुती
- पुण्यात हजारो दस्तांची बेकायदा नोंदणी; तीन वर्षांपासूनचा काळाबाजार उघड
- सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका