एलएचबी कोच असलेला विस्टाडोम हा देशातील पहिलाच डबा पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीला जोडण्यात आला आहे. या मार्गावरील रेल्वे ही देशात सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वेगाडी असेल. तिचा ताशी वेग १८० किमी असेल. विस्टाडोमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या डब्याला काचेच्या पारदर्शक मोठ्या खिडक्या आहेत. डब्याचे छप्पर देखील काचेचे असेल. या पारदर्शक डब्यातून प्रवाशांना सह्याद्री डोंगररांगांमधले असंख्य धबधबे, हिरवीगार पर्वतराजी यांचे सौंदर्य अनुभवण्यास मिळणार आहे. विस्टाडोम डब्यात 44 प्रवासी बसू शकणार आहेत. या डब्यात संगीताचाही आनंद लुटता येणार आहे.Deccan and Deccan Queen run from Saturday, beauty of Nihala Sahyadri from Vistadom coach
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली पुणे- मुंबई इंटरसिटी रेल्वे येत्या शनिवार पासून (दि. २६) सुरू होत आहे. विशेष म्हणजे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील लोकप्रिय डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. देशातील रेल्वेतला हा पहिलाच प्रयोग असून यामुळे प्रवाशांना खंडाळा घाटातील सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
या प्रवासासाठी एका प्रवाशाला ८३५ रुपयांचे तिकीट काढावे लागेल.डेक्कन क्वीन २५ जुनला मुंबईतून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी पुण्याकडे निघेल. ही गाडी पुण्यात रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. तर २६ जुनपासून पुणे स्थानकावर या गाडीची नियमित सेवा सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
यापुर्वी मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला विस्टाडोम कोच जोडला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्याच निर्णय घेतला गेला.
यामुळे प्रवाशांना माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा घाट तसेच लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे, धबधबे या संपन्न निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतील.
डेक्कन एक्सप्रेस (०१००७) ही गाडी शनिवारी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावरून निघून ११ वाजून पाच मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. हीच गाडी (०१००८) पुन्हा पुणे स्थानकावरून दुपारी सव्वातीनला निघून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.
Deccan and Deccan Queen run from Saturday, beauty of Nihala Sahyadri from Vistadom coach
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकार देणार कामगारांना भेट, अर्जित सुट्यांची संख्या होणार ३००, नव्या कामगार कायद्याबाबत बैठक
- भारताचे गुंतवणूक गुरू राकेश झुनझुनवाला म्हणतात, पैंज लावा कोरोनाची तिसरी लाट येणार नाही
- केंद्र सरकार करणार खर्चात काटकसर, हवाई प्रवास, बैठकांतील चहा, नाष्टयाचा खर्च होणार कमी
- नीरव मोदीला भारतात आणणारच, ब्रिटन न्यायालयाने प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळली
- उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे कोरोना वाढला, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सवाल