• Download App
    दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती|Dalit Panther Golden Festival Committee to be set upInformation of Union Minister of State Ramdas Athavale

    दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दलित पँथरच्या स्थापनेला यंदा ९ जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीची स्थापना करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला. Dalit Panther Golden Festival Committee to be set upInformation of Union Minister of State Ramdas Athavale

    याबाबत आंबेडकरी चळवळीतील विचारवंत नेते अर्जुन डांगळे व रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस विचारवंत नेते अविनाश महातेकर ,दिलीप जगताप प्रेम गोहिल ,चंद्रकांत हंडोरे यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली. त्यात दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.



    यासाठी राज्यातील आंबेडकरी चळवळीचे सर्व साहित्यिक विचारवंत दलित पँथर्सशी संबंध राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांना दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीच्या स्थापनेसाठी बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे.दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव निमित्त स्थापन करण्याच्या समितीची बैठक येत्या १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत घेणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.

    दलित पँथरने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा तरुणांना दिली आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचे दलित पँथर उर्जास्रोत राहिला आहे त्यामुळे दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव समग्र आंबेडकरी चळवळीच्या वतीने साजरा करण्यासाठी सर्वसमावेशक दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली.

    Dalit Panther Golden Festival Committee to be set upInformation of Union Minister of State Ramdas Athavale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!