• Download App
    तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा। Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers

    तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

    वृत्तसंस्था

    मुंबई : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers

    केंद्र आणि राज्य शासन देत असलेली प्रत्येकी ३ टक्के व्याजदर सवलतीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सुधारणा केली आहे.



    उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. पीककर्जावर एकूण ६ टक्के व्याज आकारले जाते. त्यातील तीन टक्के व्याज सवलत केंद्र सरकार देते. आज राज्य शासनाने तीन टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याज पडणार आहे.

    Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!