Sant Kalicharan Maharaj : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021 ची सांगता झाली. मात्र, या कार्यक्रमाचा शेवट वादात झाला. धर्मसंसदेचा शेवटचा दिवस होता, त्यामध्ये संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी बापूंना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार धरले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी यावर जोरदार टीका केली आहे. Controversial FIR filed against Sant Kalicharan Maharaj, insults hurled at Mahatma Gandhi in Dharmasansad
वृत्तसंस्था
रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021 ची सांगता झाली. मात्र, या कार्यक्रमाचा शेवट वादात झाला. धर्मसंसदेचा शेवटचा दिवस होता, त्यामध्ये संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी बापूंना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार धरले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
महात्मा गांधींवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर टिकरापारा पोलीस ठाण्यात अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायपूरमधील रावण भटा मैदानावर आयोजित 2 दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी बोलताना कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यावर ते म्हणाले, “राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. त्यांनी 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर ते हस्तगत केले. त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. राजकारणातून बांगलादेश आणि पाकिस्तानवरही कब्जा केला होता… मी नथुराम गोडसेला सलाम करतो की त्याने मोहनदास करमचंद गांधींची हत्या केली.
महंत रामसुंदर यांच्याकडूनही निषेध
संत कालीचरण यांनी बापूंवर हे वक्तव्य केल्यावर कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक आणि राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत कार्यक्रम सोडला. नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, “मी धर्म संसदेपासून दूर आहे आणि पुढील वर्षी ते धर्म संसदेत उपस्थित राहणार नाहीत. कारण इथे मंचावरून महात्मा गांधींविरोधात अशोभनीय गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. आमचा विरोध आहे.” रागाच्या भरात ते मंचावरून निघून गेले आणि धर्मसंसदेतून निघून गेले. यानंतर धर्म संसदेचे वातावरण पूर्णपणे बदलले. संतांमध्ये घबराट पसरली आणि याबरोबरच धर्म संसद रद्द करण्यात आली.
काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांकडून टीका
त्यावर काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, हे भगवे कपडे घातलेले फ्रॉड उघडपणे महात्मा गांधींना शिव्या घालत आहेत, त्यांना त्वरित आत टाकले पाहिजे. गांधीजींशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा अक्षम्य गुन्हा आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदीजी तुम्ही कसला देश बनवला? जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खुल्या मंचावरून शिव्या दिल्या जात आहेत आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोह लावा, हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल.’
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.
Controversial FIR filed against Sant Kalicharan Maharaj, insults hurled at Mahatma Gandhi in Dharmasansad
महत्त्वाच्या बातम्या
- भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली
- Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण
- WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार
- औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…