• Download App
    काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर|Congress-NCP's lesson to Shiv Sena, despite holding joint elections, kept the away from office bearers election

    काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : सहकारी बॅँकांच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवितात हे उस्मानाबाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दिसून आले आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली, बहुमत मिळविले. मात्र, पदाधिकारी निवडीच्या वेळी शिवसेनेला अलगद बाजुला ठेवला.Congress-NCP’s lesson to Shiv Sena, despite holding joint elections, kept the away from office bearers election

    उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यातील पाच जागा बिनविरोध निघाल्या होत्या, तर १० जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. यामध्ये सर्वच दहाही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.



    सोमवारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. कॉँँग्रेसचे बापूराव पाटील यांनी अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यापाठोपाठ शिवसेनेचेही अर्ज दाखल झाले. शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी संजय देशमुख, तर उपाध्यक्ष पदासाठी बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध व्हावी,

    यासाठी माघार घेण्याच्या वेळेपर्यंत प्रयत्न झाले. मात्र, कोणीही माघार न घेतल्याने शेवटी मतदान घ्यावे लागले. यामध्ये ११ मते घेऊन बापूराव पाटील व मधुकर मोटे विजयी झाले, तर शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख व बळवंत तांबारे यांना प्रत्येकी ४ मते पडली.

    महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अगदी निवडीच्या काही काळ आधीपर्यंत सर्व काही आलबेल होते. मात्र, काही तास आधी शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि सेनेचे अर्ज भरले गेले.

    Congress-NCP’s lesson to Shiv Sena, despite holding joint elections, kept the away from office bearers election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!