सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे, असा संताप माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.Children’s play in current politics, Bigg Boss show starts in the state, criticism of Pankaja Munde
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे, असा संताप माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे. मलिक दररोज काहीतरी आरोप करत आहेत. या सगळ्यामध्ये राज्यातील इतर महत्वाचे विषय मागे पडत आहेत. यावर संताप व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे.
सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहून नये, तर असे कार्य करावे की ज्या कायार्ची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल, असा टोल पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.
Children’s play in current politics, Bigg Boss show starts in the state, criticism of Pankaja Munde
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!