• Download App
    सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ वर्ध्यात मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले|By collective prayer Tulsi marriage started

    WATCH : सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ वर्ध्यात मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले

    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : वर्धा शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. ग्रामीण भागात या तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असते.By collective prayer Tulsi marriage started

    कार्तिक महिन्यात तुळशी विवाहानंतरच गावोगावच्या विवाह समारंभाना सुरुवात होते. भारतीय संस्कृती तसेच सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी वर्धा शहरातील देशमुख ले आऊट भागात मागील १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा सातत्याने सुरु आहे.



    तुळशी समोर मंगलाष्टकांना सुरवात होते. मंगलाष्टकं पूर्ण होताच आरती करून हे विवाह समारंभ पार पडले, अशी घोषणा पंडितांकडून केली जाते. विशेष बाब म्हणजे वधु पक्षा कडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते.

    •  सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ
    • मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले
    • कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात
    •  देशमुख ले आऊट भागात १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा
    • विवाहानंतर समूह भोजनाची परंपरा कायम

    By collective prayer Tulsi marriage started

    Related posts

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे