• Download App
    व्यापार सुरु करण्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह ; 1 जूनपासून लॉकडाऊन हटवा ; संघटनांची मागणी|Business men Urges CM to start trade from 1 June

    व्यापार सुरु करण्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह ; 1 जूनपासून लॉकडाऊन हटवा ; संघटनांची मागणी

    वृत्तसंस्था

    मुंबई : येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे, अशी मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Business men Urges CM to start trade from 1 June

    राज्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. तरी कृपया लॉकडाऊन हटवा,अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.



    महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांत सर्व व्यापार सुरू आहेत. पण, व्यापार बंद राहिल्यास व्यापारी शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.

    त्यामुळे आता 1 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्‍यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही ललित गांधी केली. या बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

    मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असुन सरकाने त्वरित निर्णय जाहीर करण्याची मागणीही केली आहे.

    निवेदनातील मागण्या

    •  दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करा
    •  वेगवेगळ्या परवाना फीमध्ये एक वर्षाची माफी द्यावी
    •  प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल व कर्जावरील व्याजमाफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्‍यांसाठी जाहीर करावे
    •  व्यापारी, कर्मचार्‍यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करा

    Business men Urges CM to start trade from 1 June

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस