• Download App
    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा । Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions

    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. 


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions

    सीआयसीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या मुंबईच्या आयईएस ओरियन शाळेच्या विद्यार्थिनी अनन्या पत्की आणि चार आयजीसीएसई विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर हा आदेश देण्यात आला. दरम्यान, कोरोना महामारीमुळे या वर्षी 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांचे निकाल विशेष मूल्यमापन धोरणाद्वारे तयार करण्यात आले. यामुळे अनेक संस्था थेट 10 वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देत नाहीयेत, त्यासाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जात आहे.

    कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) 21 ऑगस्ट 2021 रोजी राज्यभर घेण्यात येणार होती. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारने 28 मे रोजी जारी केलेली अधिसूचना बाजूला ठेवली, ज्यात उल्लेख होता की, सर्व बोर्डांमध्ये 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सीईटी आयोजित केली जाईल, ज्याच्या आधारे ते इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.

    उच्च न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकारला अशी अधिसूचना जारी करण्याचा अधिकार नाही आणि हे न्यायालय अशा घोर अन्यायाच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकते. न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे 10 वीचे गुण आणि अंतर्गत मूल्यांकन लक्षात घेऊन प्रवेश देणे सुरू करावे आणि सहा आठवड्यांच्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!