प्रतिनिधी
मुंबई : भाजप- शिवसेना यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा नाही, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी युतीबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.संजय राऊत यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. तसे कोणतेही कारस्थान नसल्याचे त्यांनी सांगितले.BJP-Shiv Sena alliance No discussion : chandrkat patil
विक्रम गोखले म्हणाले,की अडीच वर्ष मुखमंत्री पदाबाबत चूक झाली,ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टॅली करायला हरकत नाही,मात्र आम्ही म्हणालो होतो की, उपमुख्यमंत्री आणि महत्वाची खाती तुम्ही घ्या,त्यामुळे आम्हाला चूक मान्य नाही.
बाळासाहेब यांच्या बद्दलच प्रेम हे बेगडी प्रेम नाही,१९९३ च्या दंगलीत आम्हाला बाळासाहेबांनी वाचविले,त्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो,मात्र त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाणार आहोत, असे कुणीही समजू नये.
त्यामुळे राज्यात ज्या चर्चा युतीच्या चालू आहेत त्याला चंद्रकांत पाटील त्यांनी पूर्णपणे नाकारले आहे कंगना राणावत यांच्या वक्तव्याशी चंद्रकांत पाटील यांनी असहमती दर्शवली. तसेच त्या वक्तव्याला विरोध केला.
- भाजप – शिवसेना युतीची कोणतीही चर्चा नाही
- युतीबाबत होणाऱ्या चर्चेला राज्यात पूर्णविराम
- राष्ट्रपती राजवटीचे कोणतेही कारस्थान नाही
- संजय राऊत यांच्या वक्तव्याची उडविली खिल्ली
- कंगना राणावत यांच्या वक्तव्याला विरोध