प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. Bhagat Singh Koshyari ‘BJP’ Pal! Criticism of Nana Patole
विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणुक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही.
आघाडीतील तिन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे, सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे. एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू असे पटोले म्हणाले.
Bhagat Singh Koshyari ‘BJP’ Pal! Criticism of Nana Patole
महत्त्वाच्या बातम्या
- UTTARAKHAND ELECTION : पराभव जिव्हारी – काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी ! होळीत माझंही दहन करा – काँग्रेसच्या आरोपानंतर हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया….
- The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री यांनी उघड केले ‘अर्धसत्य’…कपिलला भारताबद्दल प्रेम नाही ना काश्मीर बद्दल आदर …आता कपिल शर्मा पुन्हा हिटलिस्ट वर
- Hijab Ban Karnataka HC : हिजाब बंदीचा कोर्टाचा निर्णय अमान्य; कर्नाटकात मुस्लीम विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!!
- क्रूड ऑइल दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; रशियाकडून इंडियन ऑइलने खरेदी केले कच्चे तेल