वृत्तसंस्था
मुंबई : एसटी बससेवा संपामुळे बंद असल्यामुळे मुंबईतील चाकरमानी कोकणात शिमगा कसा साजरा करण्यासाठी जायचे या विवंचनेत पडले आहेत. काही जणांनी तर ठाकरे पवार सरकारविरोधात होळी अगोदरच बोंब ठोकली आहे. तसेच नगरपालिका निवडणुकीत बरोबर इंग दाखवतो आणि करेक्ट कार्यक्रम करण्याचा पक्का इरादा केला आहे. As there is no ST bus, Chakarmanya’s cries in the name of Thackeray-Pawar government; Inga will contest in the municipal elections
एसटीचा शासनातं विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. १०० पेक्षा जास्त दिवस होऊनही ठाकरे पवार सरकारने पावले उचलली नाहीत. आता शिमग्याला जाण्यासाठी एसटी उपलब्ध नाही. त्यामुळे चाकरमानी संतप्त झाले आहेत. त्यांनी ठाकरे पवार सरकारच्या नावाने शिमगा केला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड, चिपळूण येथे जाण्यासाठी एसटीच्या तिकिट ३५० ते ७०० रुपये आहे खासगी बसने जाण्यासाठी ९०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. खासगी कारने जाणे त्याहूनही खर्चिक आहे.