गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेमुळे वेगवेगळ्या राज्यांमधून धमकीचे फोन आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.Aryan Khan case: Minister Nawab Malik granted Y + grade security
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह सोबत असणारा पोलीस गार्ड होता.नवाब मलिक यांना आता वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.
वाय प्लस सुरक्षा
वाय प्लस सुरक्षेअंतर्गत नवाब मलिक निवासस्थानी पायलट कारसह चार सशस्त्र पोलीस रक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेमुळे वेगवेगळ्या राज्यांमधून धमकीचे फोन आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गेल्या आठवड्यात मुंबई किनाऱ्यावरील एका आलिशान क्रूझवर टाकलेला छापा बनावट होता, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
पुढे नवाब मलिक म्हणाले की , “भाजप गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे.दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी केलेली कारवाई ही त्या षडयंत्राचा भाग म्हणून बनावट होती,”
” एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची हेरगिरी कोण करत आहे, हे माहित नाही. मात्र जर वानखेडे यांनी नाव घेऊन मी नवाब मलिक त्यांची हेरगिरी करत आहे,” असं सांगितलं तर मी त्यांना उत्तर देईन, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
Aryan Khan case: Minister Nawab Malik granted Y + grade security
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादवांसह अनेक नेत्यांनी महानवमीला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- कार्यकक्षा वाढविण्याबाबत सीमा सुरक्षा दलाचा महत्त्वपूर्ण खुलासा; फक्त फौजदारी कायद्यात बदल बाकीच्यात नाही
- ईडीने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले; मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे प्रकरण
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट