• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच |Anil Deshmukh gets in trouble

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. देशमुख यांच्या याचिकेवर आता २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ईडीने याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.Anil Deshmukh gets in trouble

    पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीसमोर हजेरी लावलेली नाही. समन्सविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.



    ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नवी दिल्लीतून बाजू मांडणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी आॅनलाइन घ्यावी, अशी मागणी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केली. या मागणीला देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी आणि ॲड. विक्रम चौधरी यांनी विरोध केला.

    ईडी याचिकेची सुनावणी होऊ नये म्हणून विलंब करीत आहे. केवळ दबाव निर्माण करून ईडी नाहक विलंब करीत आहे. त्यामुळे न्यायालयाने आज सुनावणी घ्यावी आणि देशमुख यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.

    Anil Deshmukh gets in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही