• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच |Anil Deshmukh gets in trouble

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. देशमुख यांच्या याचिकेवर आता २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ईडीने याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.Anil Deshmukh gets in trouble

    पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीसमोर हजेरी लावलेली नाही. समन्सविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.



    ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नवी दिल्लीतून बाजू मांडणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी आॅनलाइन घ्यावी, अशी मागणी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केली. या मागणीला देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी आणि ॲड. विक्रम चौधरी यांनी विरोध केला.

    ईडी याचिकेची सुनावणी होऊ नये म्हणून विलंब करीत आहे. केवळ दबाव निर्माण करून ईडी नाहक विलंब करीत आहे. त्यामुळे न्यायालयाने आज सुनावणी घ्यावी आणि देशमुख यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.

    Anil Deshmukh gets in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल