विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई-नागपूर महामार्गावर प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठीही उड्डारपूल बनविले आहेत. यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाला संवदेनशील विकास म्हणत ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. आम्हाला अशा पायाभूत सुविधांचा विकास हवा आहे,Anand Mahindra praises Nitin Gadkari for sensitive development
जो आपल्या आधीपासून या पृथ्वीवर राहत असलेल्या जिवांप्रति संवेदनशील असेल, असे त्यांनी म्हटले आहे.आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई-नागपूर महामागार्बाबत एक बातमी शेअर केली आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर प्राण्यांसाठी खास उड्डाणपूल बनवण्यात आले आहेत.
त्यामुळे त्यांना जंगलाच्या एका भागातून दुसºया भागात जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही. बिबट्यासारखे वन्य प्राणी रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी या संपूर्ण महामागार्ला कुंपणही घालण्यात येत आहे. ही बातमी त्यांनी ट्विट केली आहे.
मुंबई-नागपूर महामार्ग सुमारे 700 किलोमीटर्स लांबीचा आहे. हा महामार्ग देशातला पहिलाच असा महामार्ग असेल, जिथे असा ‘अॅनिमल फ्लायओव्हर’ किंवा ‘वाइल्ड लाइफ ओव्हरपास’ बांधला जाणार आहे. या संपूर्ण महामागार्चा 117 किमीचा प्रवास जंगल, टायगर कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमधून जातो.
यासाठी एकूण 9 वाइल्डलाइफ ओव्हरपास आणि 17 अंडरपास बनवण्यात आले आहेत. हा महत्त्वाकांक्षी महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही शहरांमधलं प्रवासाचं अंतर खूप कमी होणार आहे. नागपूर-मुंबई प्रवासासाठी सध्या 16 तास लागतात. हा हायवे सुरू झाल्यानंतर केवळ 8 तास लागतील.
या ग्रीन ब्रिजचं बांधकाम सुरू असून, काम वेगानं सुरू आहे. काही बांधकामंही पूर्ण झाली आहेत. यापैकी बहुतेक संरचना 32, 45 आणि 60 मीटर रुंद आणि 120 मीटर लांब आहेत. यामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल. तसंच खाली रहदारी सुरू असतानाही प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ते ओलांडता यावेत, यासाठी त्याची रचना नैसर्गिक जंगलासारखी करण्यात येईल, जेणेकरून प्राण्यांना त्रास होणार नाही.
Anand Mahindra praises Nitin Gadkari for sensitive development
महत्त्वाच्या बातम्या
- डॅनीने नाकारला होता ‘शोले’ मधील गब्बर
- आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी
- Shivsena – BJP alliance : शिवसेना-भाजप युती होणार का??; उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसैनिकांना लढण्यासाठी वाट मोकळी केली पाहिजे!!
- राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल
- औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह बंदच विद्यार्थ्यांची गैरसोय; तात्काळ सुरु करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी