विशेष प्रतिनिधी
अमरावती :त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणाव निर्माण झाला.अमरावतीत सलग दुसऱ्या कालही (१३ नोव्हेंबर) हिंसाचाराचा भडका उडला. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच चार दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . AMRAWATI VIOLANCE: Internet services were shut down and a four-day curfew was imposed in Amravati
सलग दुसऱ्या दिवशीही हिंसेचा भडका उडाल्यानं अमरावती प्रशासनानं सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर दूरसंचार कंपन्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इंटरनेट सेवा बंद केली.पुढील तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने शनिवारी (१३ नोव्हेंबर) कर्फ्यू (कलम १४४) लागू केला. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील चार दिवस कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याची माहिती दिली.
पालकमंत्र्यांची सर्वधर्मीय नेत्यांशी चर्चा
शनिवारीही अमरावती शहरात हिंसेचा उद्रेक झाल्यानं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहरातील तणाव निवळण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्मीय नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या बैठकीतही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व पक्षीय नेत्यांना शांतता प्रस्थापित करण्याबद्दल आवाहन केलं.
AMRAWATI VIOLANCE: Internet services were shut down and a four-day curfew was imposed in Amravati
महत्त्वाच्या बातम्या
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
- TERRORIST ATTACK : मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू