• Download App
    अदानी भेटून गेल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; धारावी पुनर्विकासाची चर्चा की शिजली वेगळीच खिचडी?? After meeting Adani, Raj Thackeray meets Fadnavis

    अदानी भेटून गेल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; धारावी पुनर्विकासाची चर्चा की शिजली वेगळीच खिचडी??

    प्रतिनिधी

    मुंबई : श्रीमंतीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असेलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ येथे भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया आधीच उंचावल्या होत्या. त्यानंतर लागलीच राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहोचल्यामुळे त्या भूवया अधिकच ताणल्या गेल्या. मोठ मोठ्या तर्कवितर्कांसह चर्चेला उधाण आले. After meeting Adani, Raj Thackeray meets Fadnavis



    धारावी पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा

    गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती आहे.

    विशेष म्हणजे या भेटीनंतर आणखी महत्त्वाची घडामोड घडली. गौतम अदानी यांच्या भेटीनंतर अवघ्या तासाभरात राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या विषयी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले.

    गौतम अदानी यांच्या भेटी नंतर राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये फक्त धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाची चर्चा झाली की आणखी कोणती राजकीय खिचडी शिजली?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    After meeting Adani, Raj Thackeray meets Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?