विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे आणि लँडस्लाइड्समुळे आंबा घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मागील दोन आठवड्यांपासून हा घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आता कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या अधिकार्यांनी या गोष्टीवर चर्चा करून यातून मार्ग काढला आहे.
aamba Ghat will be reopened for heavy vehicles
लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे.. तात्पुरती डागडुजी करून हलक्या वाहनांसाठी हा मार्ग काही काळापुरता चालू होता. पण आता आंबाघाट तसेच कोल्हापूर- रत्नागिरी हायवे लवकरच जड वाहनांसाठी सुरू केले जाणार आहेत. व्यापार वाहतुकीच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मार्ग आहे.
आंबा घाटामध्ये दुरूस्तीचे काम चालू होते. त्यामुळे अणुस्कुरा घाटमधून तात्पुरती वाहतूक चालू होती. पण या मार्गे वाहतूक करणे लांबपल्ल्याचे आहे. त्यामध्ये वाढत्या डिझेलच्या किमती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने आंबाघाट व्यापार वाहतुकीसाठी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातील खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की आंबाघाट सहा चाकी वाहनांसाठी टेम्पो ट्रकसाठी पुढील दोन आठवड्यांमध्ये सुरू करण्यात येईल.
aamba Ghat will be reopened for heavy vehicles
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द