पुण्यात पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीत झाले शिक्कामोर्तब
विशेष प्रतिनिधी
पुणे : आगामी ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. साने गुरुंजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे साहित्य संमेलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. पुण्यात पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 97th Marathi Sahitya Samelan to be held in Amalner
खरंतर या संमेलनासाठी सांगलीमधील औदुंबर, सातारा आणि अमळनेर या तीन ठिकाणांमध्ये चुरस होती. शिवाय, मराठवाड्यातील जालना शहराचाही प्रस्ताव होता. मात्र यामध्ये अमळनेरची निवड झाली आहे. या अगादरचे म्हणजेच ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्धामध्ये पार पडले आहे.
अमळनेरला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकासाचा वारसा लाभलेला आहे. सानेगुरुजींच्या वाड्मयीन कर्मभूमीत हे साहित्य संमलेन जवळपास ५०च्या दशकानंतर पहिल्यांदाच होत आहे. साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमधील सदस्यांनी प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी केली आणि त्यानंतर प्रस्तावावर निर्णय झाला.
97th Marathi Sahitya Samelan to be held in Amalner
महत्वाच्या बातम्या
- सत्यपाल मलिकांना मिळालेल्या CBIच्या समन्सवर गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण
- … तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल
- अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…