• Download App
    जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी; शहरात विविध ठिकाणी मृतदेह आढळले|4 died due to cold weather in Jalgaon

    जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी; शहरात विविध ठिकाणी मृतदेह आढळले

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव: जळगावात अतिथंडीमुळे चौघांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जळगावमध्ये थंडी वाढली. त्याचा हा परिणाम होता.4 died due to cold weather in Jalgaon

    तापमानाचा पारा ७.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. मृत चौघेही निराधार आणि बेघर होते. ते रस्त्याकडेला झोपले होते. थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करत होते. विविध ठिकाणी ते मृतावस्थेत आढळले.



    मृत व्यक्ती नेमके कोण? याची माहिती पोलिसांना मिळाली नाही.ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली

    यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला आहे.

    4 died due to cold weather in Jalgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील

    (नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाट्टेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकावा!!; लिबरल पत्रकारांचा नवा “उद्योग”!!