• Download App
    ठाकरे सरकारविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार - अभिमन्यू पवार Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar

    ठाकरे सरकारविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार – अभिमन्यू पवार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आमच्या नियमबाह्य निलंबन प्रकरणाचा सरकारकडून अहवाल मागवून घ्यावा, अशी विनंती केली , असे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच लोक्षाहीविरोधी वर्तन करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार राज्यपालांकडे केली असल्याचे ते म्हणाले. Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar

    तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी १२ आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले, अशी माहिती पवार यांनी दिली.

    ते म्हणाले, निलंबित १२ आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना असे सांगितले की, योग्य ती शहानिशा करून आमच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती केली. लोकशाही विरोधी काम करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

    पवार म्हणाले, ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवला म्हणून आघाडी सरकारने खोटे कथन करून आम्हाला निलंबित केलं आहे. मिळालेले अधिकार चुकीच्या पद्धतीनं वापरणाऱ्या सरकारने ‘आपल्या सगळ्यांच्या वरती सर्वोच्च असे जनतेचे न्यायालय आहे’ याचा फक्त विसर पडू देऊ नये.

    Written Complaint Against Thackeray Government to Governor: Abhimanyu pawar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा