वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला दोन दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आज बुधवारच्या (ता. 28) मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. Will the lockdown increase ?; Public attention to the decision of today’s meeting of the state cabinet
बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही,याची प्राथमिक चर्चा होईल. शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम होतोय आणि वाढवला तर किती होईल यावर सगळं अवलंबून आहे.
गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली.
दरम्यान, लॉकडाऊन वाढवला तर कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. लॉकडाऊन उघडण्याची घाई केली तर राज्यात मोठे नुकसान होण्याची आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
राज्यातील कोरोनाची स्थिती
- रुग्णवाढीचा आलेख कायम आहे.
- – मंगळवारी 66 हजार 358 रुग्ण वाढले
- – 24 तासात 895 रुग्णांचा मृत्यू
- – मंगळवारी 67 हजार 752 रुग्ण बरे
- – एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे
- – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 टक्के
- – मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे