• Download App
    Jayant Patil जयंत पाटील पक्ष बदलणार? सांगलीत महत्त्वाची बैठक

    Jayant Patil : जयंत पाटील पक्ष बदलणार? सांगलीत महत्त्वाची बैठक; लवकरच ठरणार दिशा

    Jayant Patil

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Jayant Patil राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चा गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज (शनिवार, १५ मार्च) सांगलीतील भोसले सभागृहात त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये ते अजित पवार गटात जाणार की थेट भाजपमध्ये प्रवेश करणार, यावर चर्चा होईल.Jayant Patil

    राजकीय स्थिती बदलतेय

    अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते बनले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत त्यांची भूमिका कमी झाली. त्यामुळे त्यांना वाटू लागले की त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. याच कारणामुळे त्यांनी काही कार्यक्रमांमध्ये “माझी गॅरंटी घेऊ नका” असे वक्तव्य केले होते.



    शरद पवारांशीही चर्चा

    जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की अजित पवार गटात राहून मंत्रीपद मिळवणार, याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल. त्यांनी यासंदर्भात शरद पवारांशीही चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

    मुलासाठीही राजकीय गणित

    पूर्वी जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती, पण आता त्यांनी भूमिका मवाळ केली आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी निशिकांत पाटील यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या सुपुत्र हर्षवर्धन पाटील यांच्यासाठीही राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

    Will Jayant Patil change party? Important meeting in Sangli; Direction will be decided soon

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!