• Download App
    गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? अंकुश काकडे यांचा प्रश्न । Why is Girish Bapat now experiencing water scarcity? Question by Ankush Kakade

    गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? अंकुश काकडे यांचा प्रश्न

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होते. त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे. ही वस्तुस्थिती खासदार गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहेआहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी व्यक्त केली. Why is Girish Bapat now experiencing water scarcity? Question by Ankush Kakade



    काकडे म्हणाले, ” काल बापट यांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली. माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे. जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्तांवर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपा चा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही. ”

    Why is Girish Bapat now experiencing water scarcity? Question by Ankush Kakade

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : ब्राह्मण समाजाचे काम दुधात साखरे सारखे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    Ajit Pawar : परभणीत पवारांना मोठा धक्का; माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अजित पवार यांना साथ

    Amol Mitkari : हाके यांनी ओबीसी उमेदवारावर दबाव टाकून विधानसभा लढवण्यापासून परावृत्त केलं, अमोल मिटकरी यांचा आरोप