• Download App
    विधान सभेतील कर्मचाऱ्यांना ६ वाजता घरी जाण्यास का सांगितले ? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालWhy did you ask the staff of Vidhan Sabha to go home at 6 o'clock? Nitesh Rane's sharp question to the Chief Minister

    विधान सभेतील कर्मचाऱ्यांना ६ वाजता घरी जाण्यास का सांगितले ? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

    अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.Why did you ask the staff of Vidhan Sabha to go home at 6 o’clock? Nitesh Rane’s sharp question to the Chief Minister


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर बरेच दिवस मुख्यमंत्री विश्रांतीवर होते. दरम्यान शुक्रवारी (१७ डिसेंबर ) रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अचानक विधान भवनात दाखल झाले.

    अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.



    विधान भवनातील विधानसभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केल्याची माहिती दिली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

    नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री विधान भवनात गेले असतील तर ही खूप आनंदाची बातमी आहे. पण जर मुख्यमंत्री गेले होते तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे का बंद ठेवण्यात आले होते ? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.पुढे राणे म्हणले की , विधान सभेतील कर्मचाऱ्यांना ६ वाजता घरी जाण्यास का सांगितले होते.एवढं कसले गुपित आहे? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

    Why did you ask the staff of Vidhan Sabha to go home at 6 o’clock? Nitesh Rane’s sharp question to the Chief Minister

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील