• Download App
    हल्दीघाटी असो की गलवान व्हॅली, भारत कधीही झुकणार नाही - राजनाथ सिंह Whether it was Haldighati or Galwan valley India will never bow down Union Minister Rajnath Singh

    हल्दीघाटी असो की गलवान व्हॅली, भारत कधीही झुकणार नाही – राजनाथ सिंह

    औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्याचा मला आनंद आहे, असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती  संभाजीनगर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संभाजी नगर येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले- हिंदुस्थानात हिंदवी साम्राज्याची स्थापना करणारे लोकनेते छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली शौर्य आणि पराक्रमाची परंपरा संभाजी महाराजांनी उत्तम प्रकारे पार पाडली. पुढे ही परंपरा भारतातील मराठा साम्राज्याच्या उदयाच्या रूपाने दृढ झाली. Whether it was Haldighati or Galwan valley India will never bow down Union Minister Rajnath Singh

    याचबरोबर राजनाथ सिंह पुढे म्हणाले, संभाजी महाराजांच्या नावावरून आता औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्याचा मला आनंद आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण राज्य सरकारचे अभिनंदन करतो.

    ‘’हल्दीघाटी असो किंवा गलवान व्हॅली, आमच्या सैन्याने नेहमीच देशाच्या सन्मानाचे रक्षण केले आहे. भारताचे मस्तक कधी झुकले नाही आणि झुकणारही नाही. उरी किंवा पुलवामाची घटना असो, आपल्या देशाच्या सैन्याने दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई केली आहे. आज आपल्या देशाचे सैन्य या बाजूलाही मारू शकते आणि दुसऱ्या बाजूलाही मारू शकते. आम्ही कोणाची छेड काढत नाही, पण जेव्हा कोणी आम्हाला छेडले तर आम्ही त्याला सोडणार नाही.’’ असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.

    याशिवाय राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ‘’त्या काळातील महाराणा प्रताप यांचे समर्पण तुम्हाला नीट समजले असेल, तर तुम्ही त्या कालखंडाला ‘मुघल काळ’ नव्हे तर ‘महाराणा काल’ म्हणाल. मातृभूमीप्रती एवढे समर्पण, धर्माप्रती एवढी नितांत निष्ठा क्वचितच पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा असेच महान व्यक्तिमत्व होते. ज्यांनी आपल्या आचरणातून असे उदाहरण मांडले, ज्याचे स्मरण  शतकानुशतके होईल. औरंगजेबाने त्यांना किती यातना दिल्या माहीत नाही, त्यांना किती यातना झाल्या हे माहीत नाही. पण हे दु:खही संभाजी महाराजांचे धर्मप्रेम थांबवू शकले नाही.’’

    Whether it was Haldighati or Galwan valley India will never bow down Union Minister Rajnath Singh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ