विशेष प्रतिनिधी
नाशिक : माणुसकीच्या दर्शनाने समाजात अजून चांगुलपणा आहे हे काही प्रसंगात लक्षात येते. तसेच अनपेक्षितपणे प्रामाणिकपणाचे दर्शन घडले की माणूस सुखावतो. इंदिरानगरमधील शरद तिवारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक शालीमारहुन इंदिरानगरला शेअर रिक्षाने येत होते. ते घरी पोहोचल्यावर आपल्या खिशात पैशाचे पाकीट नाही हे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात काही रोख रक्कम व आधारकार्ड, पॅन कार्ड,एटीएम कार्ड इत्यादी महत्त्वाचे कार्ड होते. When the vision of honesty happens !; Rickshaw driver honored in Nashik
रोख रक्कम गमावण्याचा दुःख होतेच. परंतु सर्व कार्ड्स पुन्हा नव्याने काढण्याचा मोठाच विषय होणार होता. बहुदा आपले पाकीट रिक्षात पडले असावे असा एक अंदाज त्यांना होता. परंतु रिक्षाचा नंबर अथवा रिक्षाचालकांची काहीच ओळख नव्हती.
दरम्यान घाईगर्दीत उतरतांना तिवारी यांचे पैशाचे पाकीट रिक्षात पडले. हे रिक्षातील अन्य प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने रिक्षाचालकांकडे हे पाकीट सुपूर्त केले. रोख रकमेचा कोणताही लोभ मनात न आणता रिक्षाचालक प्रेमकुमार चव्हाण यांनी कार्डावरील मोबाईल नंबरवरून तिवारी यांना संपर्क केला आणि पाकीट मिळाल्याचे सांगितले. त्याप्रमाणे ते पाकीट देण्यासाठी रिक्षा घेऊन पोहोचले.
तिवारी यांना हा अत्यंत सुखद धक्का होता. त्यांचे डोळे भरून आले. वस्तू परत मिळणे व रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा यामुळे ते भारावून गेले. संघाचे स्वयंसेवक असलेल्या तिवारींनी मोदकेश्वर प्रभात या इंदिरानगर संघशाखेवर हा सुखद अनुभव सांगितल्यावर सर्वांनाच खूप आनंद वाटला.
अशा प्रामाणिकपणाचे दर्शन घडल्यावर त्यास प्रोत्साहन देणे संघशाखेचे कामच असल्यामुळे प्रेमकुमार चव्हाण यांना शाखेवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. चव्हाण यांना सुद्धा या सन्मानाने आनंद वाटला. स्वार्थगतीच्या जमान्यात असे अनुभवांचे दर्शन घडले की अजूनही समाजजीवनातील असे अनुभव खूप आशादायक आहेत असे लक्षात येते.
When the vision of honesty happens !; Rickshaw driver honored in Nashik
-
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं