भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत.What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्याच सोबत मलिकांनी भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार आशीष शेलार यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे सडेतोड उत्तर शेलार यांनी दिले आहे.
ते म्हणाले, अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
भाजप नेते आमदार आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. त्यावर बोलताना शेलार म्हणाले, जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar
महत्त्वाच्या बातम्या
- रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नाही
- कोण होते बिरसा मुंडा? आदिवासी त्यांना देव का मानतात, जाणून घ्या मोदी सरकार आदिवासी गौरव दिन का साजरा करतंय?
- मुंबई: एनसीबीची एसआयटी आता फक्त समीर-आर्यन खान आणि अरमान कोहली प्रकरणाची चौकशी करेल, इतर तीन प्रकरणे वगळली
- भगूरच्या सावरकर जन्मस्थळाला भेट दिल्यावर बाबासाहेबांनी व्यक्त केली होती धन्यता!!