विशेष प्रतिनिधी
नाशिक : उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असताना रविवारी सकाळीच मुंबईभरातील हवेत शेजाराच्या गुजरातेतील सौराष्ट्रातून आलेली वाळवंटातील वाळू मिसळली. रविवारची आरामात उठलेल्या मुंबईकरांना काही कळायच्या आतच संपूर्ण मुंबई आणि नजीकच्या परिसराची हवा बिघडली. दुपारपर्यंत वाळूच्या कणांनी नाशिक गाठले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंड वाऱ्यांचा कहर सुरू आहे. Westerly winds: Saurashtra desert sand in Mumbai and Nashik
ही परिस्थिती आज दिवसभर राहणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले. मात्र वाळूचे कण जास्त नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंत सरकार यांनी दिला. उत्तरेतील थंडी राज्यात वाहून आणणारे पश्चिमी प्रकोप (वाऱ्याची वरच्या थरातील स्थिती) या स्थितीने किनाऱ्यानजीकच्या भागात प्रवेश करताना सौराष्ट्रातील वाळवंटातील वाळूचे कणही सोबत आणल्याने हवेचा दर्जा बिघडल्याची माहिती सरकार यांनी दिली. आज दृश्यमानता कमी राहील, असेही ते म्हणाले. उद्या सोमवारी वातावरण पूर्ववत होऊन आकाश ढगाळ राहील, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये रविवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यानंतर दिवसभर थंड वारे वाद आहेत दुपारी देखील धोक्याची सादर उलगडली गेली नव्हती नाशिक मध्ये सोमवार मंगळवारी ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आहे.
Westerly winds : Saurashtra desert sand in Mumbai and Nashik
महत्त्वाच्या बातम्या
- पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी; अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन
- “2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू” – रघुवीर खेडकर
- अहमदनगर आगारातील एसटीच्या 130 कामगारांवर कारवाई होणार, अजूनही संप सुरूच
- “अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले,आम्ही कोल्हे यांना माफ करणार नाही” – संभाजी ब्रिगेड