• Download App
    Bakri Eid बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क;

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

    Bakri Eid

    पर्यावरणपूरक होळी आणि पर्यावरणपूरक दिवाळीबद्दल बोलणारे बुद्धिजीवी आता कुठे गेले आहेत?


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर – Bakri Eid बकरी ईदनिमित्त गायींची कत्तल होऊ नये यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने रणनीती ठरवली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर प्रमुख अमोल ठाकरे म्हणाले की, बकर ईदच्या ४८ तास आधी महाराष्ट्राच्या सीमेवर बजरंग दल चौक्या उभारेल, जेणेकरून इतर राज्यांच्या सीमेवरून कोणतीही गाय किंवा गोवंश महाराष्ट्रात कत्तलीसाठी आणले जावू नये. विशेषतः नागपूर आणि चंद्रपूरच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर बजरंग दलाचे कार्यकर्ते चौक्या उभारतील आणि तेथे गस्त घालण्यास सुरुवात करतील.Bakri Eid

    विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे की, या दिवशी सुमारे २ कोटी प्राण्यांची कत्तल केली जाते. पर्यावरणपूरक होळी आणि पर्यावरणपूरक दिवाळीबद्दल बोलणारे बुद्धिजीवी आता कुठे गेले आहेत? आज पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याबद्दल ते का बोलत नाहीत? तसेच विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट आवाहन केले आणि म्हटले की, बकऱ्यांची कत्तल करावी असे कोणत्या कुराणात लिहिले आहे? जर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य केले गेले तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.



    अमोल ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गाईला राजमातेचा दर्जा देण्यात आला आहे आणि गोहत्येबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. तेव्हापासून गो तस्करांनी वेगळ्या पद्धतीने गो तस्करी सुरू केली आहे. हे गो तस्कर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा येथून गायी घेऊन नागपुरात येतात. त्यांना माहित आहे की जर त्यांनी गायी ट्रकमध्ये नेल्या तर बजरंग दलाचे लोक त्यांना पकडतील, म्हणून त्याऐवजी ते मेंढपाळांना प्रशिक्षण देत आहेत. ते हिंदू मेंढपाळांच्या मदतीने प्राण्यांना जंगलातून बाहेर काढत आहेत. बजरंग दल या जंगलातील मेंढपाळांवर लक्ष ठेवून आहे.

    तसेच ते म्हणाले की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय येऊ नये म्हणून गो तस्कर हिंदू ट्रक आणि हिंदू ट्रक चालकांचा वापर रणनीती म्हणून करत आहेत. याशिवाय, ते हिंदू मेंढपाळांना प्रशिक्षण देत आहेत. ते फक्त मेंढपाळांना या गायींना एका विशिष्ट ठिकाणी सोडण्यास सांगतात. अशा प्रकारे ते जंगलाची सीमा ओलांडत आहेत. जेणकरून, कोणालाही शंका येणार नाही की ते गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात आहेत. मात्र गायींच्या तस्करीत सहभागी असलेल्या सर्वांवर लक्ष ठेवले जाईल.

    VHP, Bajrang Dal on alert before Bakri Eid big decision taken

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Technical education institutes : आयआयटी सारख्या तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा शिरकाव? आयआयटी मुंबईतील प्राध्यापक अनुपम गुहा वादाच्या भोवऱ्यात

    Rohit Pawar : अजित पवारांवर टीका झाली तरी काेणी पुढे येत नाही, राेहित पवार यांचा टाेला

    Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!