प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येईल, त्याचबरोबर केंद्र सरकार ज्याप्रमाणे शौर्य पुरस्कार देते त्याच धर्तीवर राज्य सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात केली. Veer Savarkar Setu announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of Savarkar Jayanti
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शत जन्म शोधितांना…’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
सरकारने वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लहान मुलांना स्वातंत्र्यवीरांचे प्रखर राष्ट्रभक्ती, त्यांचा त्याग त्यांना शिकवला जावा यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येईल. वीर सावरकर यांच्या मृत्यूला ५७ वर्षे झाली तरी अनेकांना वीर सावरकर कळले नाहीत. काही लोक त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. वीर सावरकर यांचा अतोनात छळ करण्यात आला, तरी त्यांनी तडजोड केली नाही.
सावरकर यांना दोनदा जन्मठेप दिली होती, ब्रिटिशांना त्यांची दहशत होती. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, सावरकर यांना जाऊन ५७ वर्षे उलटली तरी त्यांची दहशत कायम आहे. जर वीर सावरकर यांचे विचार लोकप्रिय झाले तर आपला बाजार उठेल, अशी भीती टीकाकारांना वाटत आहे, जबरदस्त टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
Veer Savarkar Setu announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of Savarkar Jayanti
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..