विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर दोन ठिकाणी वीज पडल्याने मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे.Unseasonal Rain lashes states , Ten Died Due To Thunderstorms
प्रतापगंजपेठेत घराच्या टेरेसवर वीज कोसळले. त्यामुळे भिंतीला भलेमोठे भगदाड पडले. तर कळंबे गावात शिखरावर वीज पडल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले.
दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे राज्यात 7 जणांनी प्राण गमावले असून 5 जनावरेही दगावले आहेत. शेतीचेही नुकसान झाले.बीड जिल्ह्यात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे ठार झाली.परभणी जिल्ह्यात वीज कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल आव्हाड (वय 12 वर्) आणि वैभव दुगणे (वय 11) अशी नावे आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे सायंकाळी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नजीकपंगरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. राधाकिसन जिजा वाघ असं याचे नाव आहे.
Unseasonal Rain lashes states , Ten Died Due To Thunderstorms
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांना मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, 59 मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी 58 मध्ये तृणमूलचा विजय
- India Fights Back : अमेरिकेतून 125,000 रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही 4 ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत
- देशात 15 दिवसांचे कडक लॉकडाऊन?, कोविड टास्क फोर्सच्या मागणीवर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता
- काळजी करू नका, मी लवकरच भारतात परतेन – आदर पूनावाला यांची माहिती
- चिनी ड्रॅगनने आता काढली सोशल मिडीयावर भारताची कुरापत, वादग्रस्त पोस्ट टाकून भारतावर टीका