• Download App
    Uddhav Thackeray मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले?

    Uddhav Thackeray : मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले?

    Uddhav Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Uddhav Thackeray  मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले? तेव्हा मी बोललो आहे, आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले.Uddhav Thackeray

    शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, आमचा हिंदीला विरोध नाही. पण, आमच्यावर हिंदीची सक्ती करायची नाही. भाषावर प्रांतरचना झाली, त्यानुसार प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला. गुजराती लोकांना गुजरात, बंगाली लोकांना बंगाल, कानाडी लोकांना कर्नाटक आणि वेगवेगळे राज्य देण्यात आले. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाले. प्रत्येक राज्याला सरकार आणि राजधानी मिळाली. परंतु, महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. नंतर मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही.Uddhav Thackeray



    शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात एकत्र येतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु, राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात येणार नसल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. यातच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे आणि युतीबद्दल मेळाव्यात काय बोलतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? पण मी सांगतोय, मराठी भाषेला हिंमत असेल तर हात लावून दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही.

    Uddhav Thackeray’s clarification on alliance with Raj Thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : सोनम वांगचुक देशद्रोही तर नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांना काय म्हणायचे?

    उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदमांचा हल्लाबोल

    मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आज शासक + प्रशासक बनायचे सांगितले; मग त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपले मराठा उमेदवार का नव्हते दिले??