• Download App
    somayya Kirit महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत

    महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत

    भाजप नेते किरीट सोमय्यांच्या विधानाने वातावरण तापले.

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : २०२४ मध्ये महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १.५० लाखांहून अधिक बांगलादेशींनी भारतीय नागरिकत्वाची बनावट कागदपत्रे मिळवली आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. या अनियमिततेची सखोल चौकशी करून त्यात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    ते म्हणाले की, सध्या राज्यात दोन लाख बेकायदेशीर बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसारखे बनावट कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर बांगलादेशी लोक बेकायदेशीरपणे भारतात येत आहेत आणि राहत आहेत हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या हल्ल्याप्रकरणी एका ३० वर्षीय बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

    पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, एकट्या भिवंडीमध्ये एक हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी शेकडोंना स्थानिक तहसील आणि ग्रामपंचायतींनी प्रमाणपत्रे दिली आहेत. जन्म प्रमाणपत्रे, मृत्यू प्रमाणपत्रे आणि संबंधित अर्जांच्या नोंदी तपासण्यात मी एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. मालेगावमध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्याचे वृत्त आहे, असे सांगितले.

    Two lakh Bangladeshis have applied for birth certificates in Maharashtra  : somayya Kirit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Satara Gazetteer : ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार; मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातील बैठकीत आरक्षणाचा आढावा

    Girish Mahajan : अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका, प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

    Bombay High Court : हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार; प्रदूषणाची सर्व आकडेवारी सार्वजनिक करण्याचे मुंबई HCचे आदेश