विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange विधानसभा इच्छुक उमेदवारांशी उद्या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मी चर्चा करणार आहे. ज्या बांधवांनी अर्ज केले आहे, त्यांनी उद्या चर्चेसाठी यावे. पण उद्या चर्चेला आलेल्यांनी आपले तिकीट फायनल झाले असू समजू नये, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेणार, असे त्यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, 20 तारखेच्या आंतरवालीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये आपण समाजातील बांधवांना आपण उमेदवार पाडायचे का उभे करायचे याबद्दल विचारणा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कागदपत्रे तयार ठेवा
मनोज जरांगे म्हणाले की, 20 तारखेला जर लढायचे ठरले तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस मिळतील त्यामळे निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे सर्वांनी तयार ठेवावी. जर पाडायचा निर्णय झाला तर होऊन होऊन काय होईल की कागदपत्रासाठी केलेला खर्च वाया जाईल. लढायचे ठरो की पाडायचे ठरले तरी आपण सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणार आहोत.
महायुतीने हीन वागणूक दिली
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांचे वाटोळे करुन तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. मविआंच्या नेत्यांपेक्षा महायुतीने मराठा समाजाला हीन वागणूक दिली आहे. सत्ताधाऱ्यांचे मागे ओबीसी उभे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना कोण निर्णय घेऊ देत नाही हे समजत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
To contest the Assembly or not? Manoj Jarange will decide on the 20th
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी