• Download App
    टायगर खतरे में है : महाराष्ट्रात ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ६५ जणांनी गमावला जीव । Tiger is in danger 23 tigers die in Maharashtra in 6 months, while wildlife attacks kill 65 in 9 months

    टायगर खतरे में है : महाराष्ट्रात ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ६५ जणांनी गमावले प्राण

    Tiger is in danger : राज्यात अवघ्या 9 महिन्यांत सुमारे 65 जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात म्हटले की, 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरदरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. Tiger is in danger 23 tigers die in Maharashtra in 6 months, while wildlife attacks kill 65 in 9 months


    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात अवघ्या 9 महिन्यांत सुमारे 65 जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत ही धक्कादायक आकडेवारी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात म्हटले की, 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरदरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 65 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    वृत्तसंस्थेनुसार, विधानसभेला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल सांगितले की, 1 जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारकडून 15 लाखांची आर्थिक मदत दिली जात आहे.

    एका अहवालानुसार, देशातील अनेक भागांमध्ये मानव आणि प्राणी यांच्यात संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत बिबट्याच्या वस्तीत घुसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

    ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू

    महाराष्ट्रात, 6 महिन्यांत (जानेवारी’21-जुलै’21) विजेचा धक्का, शिकारी आणि विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एकूण 23 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्य सरकारने एनसीटीएच्या निकषांनुसार आवश्यक ती कार्यवाही केली आहे.

    याशिवाय महाराष्ट्रात वाघाने मानवावर केलेल्या हल्ल्याच्या घटनाही या वर्षात समोर आल्या आहेत. नोव्हेंबरमध्येही एक नवीन प्रकरण समोर आले होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) येथे वाघिणीने एका महिला वनरक्षकाला बळी घेतला. एका अहवालानुसार, तिथल्या वाघांची संख्या निश्चित करण्यासाठी त्या महिला वनरक्षक इतर तीन कर्मचाऱ्यांसोबत सर्वेक्षण करत होत्या. मृत वनरक्षक स्वाती दुमणे या टाटरच्या मुख्य भागातील कोलारा वन परिक्षेत्रात तैनात होत्या.

    Tiger is in danger 23 tigers die in Maharashtra in 6 months, while wildlife attacks kill 65 in 9 months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!